जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह १० अपक्ष आमदार घेऊन शिंदेंनी बंड पुकारला. अन् थेट गुवाहाटी गाठलं. त्यानंतर राज्यातील एक एक आमदार गुवाहाटीला जात होते. या संपुर्ण राजकीय नाट्यमय घडामोडीवर अनेकदा राजकीय नेते भाष्य करताना दिसत आहेत. याच बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा त्या आठवणी जळगाव येथील कार्यक्रमात ताज्या केल्या आहेत.
“राज्यपालांच्या वाढत्या वयाचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होताना दिसतोय”; काॅंग्रेसची जहरी टिका
साधं कुणी सरपंच पद सोडत नाहीत. परंतु आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो. राज्यातील ८ जणांनी मंत्रीपद सोडून दिलं. आमची संख्या पुर्ण झाली नसती तर आम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली राहिली असती. उठावासाठी ३८ आमदार लागणार होते. मी ३३ वा होतो. ५ आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता. असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं.
“मराठवाडा विद्यापीठासाठी आंबेडकर अन् यशवंत चव्हाणांचं मोठं योगदान”; शरद पवार
एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर २२ आमदारांसह मी उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होतो त्यांनी आम्हाला दिखते हो शेर जैसे हो चुहे जैसे असं म्हणून डिवचलं. मात्र आम्ही त्यावेळी ठरवलचं होतं. असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खुनगाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यपालांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले की,”शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श…”;
दरम्यान, एकनाथ शिंदेंच बंड हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड आहे. त्यामुळे या बंडाळीची राज्यात विविध कार्यक्रमातून सातत्याने चर्चा होत असते. आगामी काळातील निवडणुकीतील प्रचाराच्या वेळी देखील या बंडाचा वापर दोन्ही पक्षांकडून केला जाईल. याची शक्यता आपण फेटाळून लावू शकत नाहीत. परंतु मतदारांनी देखील वास्तव घटना डोळ्यासमोर ठेऊन आपलं मत दिलं पाहिजे.
Read also
- “केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
- “आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
- “हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
- या 8 प्रश्नाचं उत्तर देईल का खोके सरकार ? आदित्य ठाकरे यांचे शिंदेंना सवाल
- “कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा”; महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेही आक्रमक