मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातील लोकांसाठी भावनिक पत्र लिहिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढविली आणि विधानसभेत ते आमदार झालेत. त्यानंतर गेले अडीच वर्ष आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत काही काही वेळा आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांच्या प्रश्नांना त्यांनी सडतोड उत्तरे दिलीत. यातच आता त्यांनी वरळीतील लोकांसाठी एक पत्र लिहिलं आहे.
‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
आदित्य ठाकरे यांनी पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्ष झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपुर्वी मी तुम्हाला वरळी A+ चे वचन दिले होते. गेल्या 3 वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत.
“महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत
नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राईव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे.
चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
म्हणूनच राजकीय दृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावसं वाटतंय. असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच यापुर्वी जुनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमची आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहिल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
- “राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
- अन् राष्ट्रवादीने डुल्पिकेट राज्यापालांचं धोतर फाडलं..! महाराजांबाबतच्या वादग्रस्त वकव्यानंतर तीव्र संताप
- “पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
- “शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले