मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात जोरदार आंदोलने सुरू आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. यावरून माजी खासदार संभाजी राजे यांनी फडणवीसांनावर नाराजी व्यक्त केली आहे.
“केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशू आणि महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्ये करतात आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करतात, हे कोडं आङे. ते त्यांची बाजू का घेतात? हा प्रश्न आहे. पाठराखण कसली करताय, त्यांना माफी मागायला लावा असा आक्रमक पवित्रा संभाजीराजे यांनी घेतला आहे.
“आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
राज्यपालांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं म्हणत फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावरही टिका होत आहे. या राज्यपालांना महाराष्ट्रात ठेऊ नका. पंतप्रधानांना वाटत असेल त्या राज्यात त्यांना कोश्यारींना पाठवावं. पण कोश्यारींना लवकरात लवकर महाराष्ट्राबाहेर काढावं तसेच त्रिवेदीला माफी मागायला लावावी. असंही ते म्हणाले.
“हीच संवेदनशीलता एका नेत्याला लोकनेता बनवते”; अन् एका महिलेच्या खांद्यावरील बॅग राहुल गांधींनी घेतली
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात अनेक वाद निर्माण झाले आहेत. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विरोधात राज्यातील अनेक नेत्यांनी कडाडून टिका केली आहे. तसेच आज पुण्यात राष्ट्रवादीने राज्यापालांविरोधात आंदोलने केली आहेत. तर शिवसेनेने मुंबईत राज्यपालांचे नाव असलेले खोके समु्द्रात फेकून अनोखे आंदोलन केले.
Read also
- “शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
- ‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
- “महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत
- चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
- “आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य