पुुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात आज राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत डुप्लिकेट राज्यपाल उभं करून त्यांचं धोतर फाडून तीव्र निषेध केला. तसेच वाचाळवीर राज्यपालांचा निषेध असो. कोश्यारी गो बॅक या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तसेच भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात देखील राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
“आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज हुतात्मा दिवस आहे.
“केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत ज्या हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच हुतात्म्यांच्या स्मृतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्याची वेळ येते, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, शिंदे – फडणवीस सरकारला असा महाराष्ट्र अभिप्रेत आहे का…? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
“आमचे वैचारिक व्यासपीठ एकच, दोन्ही विचारांचे वारसे घेऊन चालतोय”; उद्धव ठाकरे
छत्रपतींची तुलना नितीन गडकरी यांची केल्याने अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील राजकीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर राज्यपालांना महाराष्ट्र बाहेर हाकलून द्या. अशी मागणी देखील राज्यातील राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात राज्यपालांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
- “शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
- ‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
- “महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत
- चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल