मुंबई : राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पुण्यात आज राज्यपालांच्या विरोधात डुल्पिकेट राज्यापाल उभं करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. तर राज्यातील राजकीय नेत्यांनी राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्या. अशी भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांवरून केंद्रातील भाजपला लक्ष्य केले आहे.
चॅनेलमधील मुली पत्रकार साडी का घालत नाहीत..? सुप्रिया सुळेंचा अजब सवाल
भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महापुरूषांविषयी आक्षेपार्ह विधानं करीत आहेत. महात्मा फुलेंविषयी, शिवरायांबद्दल, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी आक्षेपार्ह विधानं करतात. ती दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर करतात. असा घणाघात अंबादास दानवे यांनी राज्यापालांवर केला आहे. तसेच महाराष्ट्राचा अपमान कऱण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही त्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
“आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
राज्यपाल असो किंवा त्रिवेदी या दोघांनीही माफी मागायला हवी. सर्वात आधी त्यांना पदावरून हाकला. अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल हे मी त्यावेळी सांगेल, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणं गरजेच आहे. आपल्या शरीराल गॅंगरीन झाल्यावर आपण शरीराचा भाग जसा कापून काढतो. तसा त्रिवेदी आणि राज्यपालांना फेकून दिलं पाहिजे. अशी जहरी टिकाही खासदार उदयन राजे यांनी केली.
“केंद्र सरकार चांगलं काम करतंय, मोदी माझे आवडते पंतप्रधान”; सुप्रिया सुळे
दरम्यान, शिवाजी जुन्या काळातील आदर्श आहेत. आताच्या काळातील बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी यांना तुम्ही आदर्श माना असं वक्तव्य राज्यपालांनी केलंय. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्राधान सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील दोन दिवसापासून चांगलचं तापलं आहे.
Read also
- अन् राष्ट्रवादीने डुल्पिकेट राज्यापालांचं धोतर फाडलं..! महाराजांबाबतच्या वादग्रस्त वकव्यानंतर तीव्र संताप
- “पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
- “शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
- ‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
- “महाराजांवर दुसरं कोणी बोललं असतं तर भाजपने थयथयाट केला असता”; संजय राऊत