मुंबई : छत्रपतीं शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा पडसाद राज्यभरात बघायला मिळत आहेत. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणावरून भाजपला कडक शब्दात इशारा दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय गायकवाड यांचं कौतुक केलं आहे.
“पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले
शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. राज्यपालांनी, भाजपच्या लोकांनी विचार करून छत्रपतींच्या बाबतीच बोललं पाहिजे. अशा प्रकारचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगलं नाही, अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील असा इशारा संजय गायकवाड यांनी भाजपला दिला आहे.
“शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
त्यावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस शिवाजी यांचा अवमान सहन करूच शकत नाही. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात नफा-नुकसान विसरून ठामपणे उभा राहण्याची हिमंत दाखविण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे. याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे अभिनंदन करतो. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात पक्ष, गट-तट आदी विसरून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. गायकवाड यांनी ते धाडस दाखवले याबद्दल त्यांचे मनापासून आभार असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल
- आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
- “हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
- “राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
- अन् राष्ट्रवादीने डुल्पिकेट राज्यापालांचं धोतर फाडलं..! महाराजांबाबतच्या वादग्रस्त वकव्यानंतर तीव्र संताप