मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रखरशब्दात टिका केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“शरीराचा भाग जसा कापून काढतो तसा त्रिवेदी अन् राज्यपालांना..”; उदयनराजे संतापले
शिवाजी जुन्या काळातील आदर्श आहेत. आजच्या काळात जर तुम्हाला आदर्श घ्यायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांना घ्या. असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यावर राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. मला एक वाटतं की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
‘टिकली’ वर टिका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का ? चित्रा वाघ यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विपर्यास किती गोंडस शब्द आहे ना…! आपल्या राज्याचा आणि महापुरूषांचा कुणी कितीही अवमान केला तरी तो अवमान करणाऱ्यांच्या म्हणण्याचा विपर्यास असतो. मग आपल्या राज्यातून उद्योग गुजरातला जातात, लाखो बेरोजगार युवा नोकऱ्या मागतात, महागाईचा भडका उडालाय, यालाही विपर्यासच म्हणणार का ? असा सवाल रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Read also
- आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
- “हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
- “राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
- अन् राष्ट्रवादीने डुल्पिकेट राज्यापालांचं धोतर फाडलं..! महाराजांबाबतच्या वादग्रस्त वकव्यानंतर तीव्र संताप
- “पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले