नवी दिल्ली : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी जहरी टिका केली. अनेक ठिकाणा यांचे प्रतित्माक पुतळे देखील जाळण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललो गेले यापेक्षा जास्त महत्वाचे आहे, कोण बोलले आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदूत्वात आणि भारतीय इतिहासात हिंदूत्वाच्या सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अवमानना आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याने स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा असं त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.
“राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
शिवाजी महाराज यांनी औरंगाजेबची चार वेळा माफी मागितली होती. असं वादग्रस्त वक्तव्य सुंधाशू त्रिवेदी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर संपुर्ण राज्यात राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्याविरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली. राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावे, अशीही मागणी विरोधकांकडून कऱण्यात आली तर त्रिवेदी यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मात्र राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी देखील या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली. त्यावरूनही विरोधकांनी फडणवीसांवर निशाणा साधत जहरी टिका केली.
Read also
- “हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- “राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”
- “प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
- “लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल
- आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”