मुंबई : मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्यावर सलग दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून राज्यात मोठा गोंधळ माजला होता. तर राष्ट्रवादीने मैदानात उतरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हांचा निषेध व्यक्त केला. त्यात संदर्भात उद्या जितेंद्र आव्हाड न्यायालयात हजर होणार आहेत.
आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना भावनिक पत्र…! म्हणाले, “तुमचे आशीर्वाद अन् प्रेम मला…”
हर हर महादेव चित्रपटांबाबत एका प्रेक्षकाला मारहाण आणि भाजपच्या महिला पदाधिकारींनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या कलम अंतर्गात गुन्हांबाबत त्यांना पोलिसांनी अटक केली होती. एक दिवस त्यांना तुरूंगात ठेऊन दुसऱ्या दिवशी आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी संंबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली देखील करण्यात आली होती. त्याच्याच बाबतीत त्यांनी ट्विट केले आहेत.
“हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता”?
माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उद्या गुन्ह्यांविरूद्ध मी कोर्टात जाईन. तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरिष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. अस त्यांनी म्हटलं आहे.
“राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”
त्याचबरोबर या संपुर्ण प्रकरणात काय करावे हे सुचत नाही. आपल्या हक्कासाठी त्या गरिबांना फासावर लटकवा, की ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरूद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्रला माहित आहे. असं म्हणत त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला लक्ष्य केलं.
Read also
- “तर त्यांनी स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा;” भाजपच्या प्रवक्त्यानी उलट विरोधकांना सुनावलं
- “हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- “राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”
- “प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
- “लाखो नोकऱ्या, महागाईचा भडका, यालाही विपर्यास म्हणणार का?”रोहित पवारांचं फडणवीसांना सवाल