पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. तसेच यावर कर्नाटक राज्य गांभीर्यांन विचार कत असल्याचं बोम्मई यांनी सांगितले आहे. यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टिप्पणी केली आहे.
“येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिमंत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यत गेली आहे. एकीकडं सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे. अशी टिकाही रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
“राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
दोनच दिवसांपुर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्त्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला आहे. याची खंत वाटते. अशी टिप्पणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
“हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
दरम्यान, राज्यातील सीमाभागातील प्रश्नाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटच्या राज्यपालांची कोल्हापुरमध्ये बैठक झाली होती. तेसच सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वय समितीही राज्य सरकारकडून तयार करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटक सरकारने मात्र 40 गावांचा विषय उकरून काढला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट #जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेलीय. एकीकडं सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडं आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे.. pic.twitter.com/dbcXUWaZek
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 23, 2022
Read also
- पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
- पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
- “आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
- महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश