जळगाव : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने आज महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रा काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यप्रदेश काॅंग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला आणि भारत जोडो यात्रेने अधिकृतपणे मध्यप्रदेशात प्रवेश केला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
“हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
बोरडेली जि. बु-हाणपुर येथे भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली. यावेळी तेथील आदिवासी बांधवानी राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले. तसेच राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांना भेटून गेल्यानंतर त्यांच्या पारंपारिक गायनात पदयात्रेतील लोकांनी सहभाग घेतला. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात दक्षिणेतील राज्यांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
तसेच महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा ज्यावेळी मध्यप्रदेशात दाखल झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेला खास पत्राद्वार संदेश पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संताच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत.
‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ
दरम्यान, कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रापर्यंत विरोध झाला नाही. पंरतु आता मध्यप्रदेशापासून राहुल गांधी यांची कठिण परिक्षा होण्याची शक्यता आहे. कारण भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत ज्या राज्यांमधून जाणार आहे. त्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप भारत जोडो यात्रेला विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काही दिवसात काय होणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
- “आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
- महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
- “येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
- “राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’