मुंबई : मागील वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजणार आहे. कारण मंगळवारी रात्री राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा पारूप तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी महापालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवेंनी वाजवली”
प्रभाग रचना, तसेच ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यातच महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यातच आता आघाडी सरकारमधील तीन सदस्यीय प्रभागाची रचना बदलून शिंदे यांनी 2017 प्रमाणे चार सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे ठरविले आहेत.
“सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली, काय होईल सांगता येत नाही”; दानवेंचं सुचक वक्तव्य
त्यामुळे या प्रभाग रचना तातडीने बनविण्याच्या सुचना पुणे, पिंपरी-चिंचवडसह, राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची निवडणुक तीनऐवजी चार सदस्यीय पद्धतीनेच होण्याची शक्यता आहे. मात्र, या आदेशात प्रभागरचनेची सदस्य संख्या स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
“कुणाची बायोपिक बघायला आवडेल?” राज ठाकरे म्हणाले की, “या देशात फक्त एकच..”
दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात निवड़णुक आयोगाचे काही अधिकार सरकारने स्वत:कडे घेतले होते. याविरूद्ध न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र त्याला स्थगिती देण्यात आलेली नाही. याच अधिकाराचा वापर करत नगरविकास विभागाकडून नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी- मार्च मध्ये होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
- “राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
- “हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
- ‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ