मुंबई : आगामी महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीकरीता राज्यातील अनेक नेते प्रचारासाठी गुजरातला गेले आहेत. भाजपचे अनेक मंत्री गुजरातमधील प्रचारासाठी व्यस्त आहेत. त्यातच आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला हाणला आहे.
“राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
तसेच आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या सरकारकडे महाराष्ट्रातील जनतेसाठी वेळच नाही. गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत. राज्यात अनेक मुद्दे असताना महाराष्ट्रातील नेते गुजरातमध्ये पाठवले आहेत. पहिले आमदार नंतर प्रकल्प आणि आता मंत्रीमंडळ पाठवलं. अशी खोचक टिप्पणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
“हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
शिवसेनेचे युवानेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जात आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार अनिल देसाई देखील जाणार आहेत. यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांनी डिवचलं आहे. तर आदित्य ठाकरेंनी आपल्या भेटीचं कारण सांगितलं आहे.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
तेजस्वी यादव आणि मी जवळपास एकाच वयाचे तरूण नेते आहोत. या भेटीत आमच्यात त्यांनी हाती घेतलेली कामं, तसेच पर्यावरण अशा अनेक गोष्टींबाबत चर्चा कदाचित होऊ शकते. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधक ज्या पद्धतीने आरोप करीत आहेत. त्या घाणेरड्या राजकारणात मला जायचं नाही. आणि कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
- पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
- “आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
- महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
- “येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”