मुंबई : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना देखील सरकार पाडणार असल्याची बातमी लागली आहे. कदाचित दोन महिन्यात राज्यात काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच भुर्भात ज्या काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याची कणक रावसाहेब दानवे यांना लागली आहे. त्यामुळे शिंदे सरकार पडणार की नाही. याबद्दल मला काही सांगायची गरज नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या उद्धघाटनाप्रसंगी रावसाहेब दानवे यांनी महत्वपुर्ण भाष्य केलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नसल्याचंही ते म्हणाले. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा. असं त्यांनी सांगितले होते.
“येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
तसेच संजय राऊतांच्या घराची रेकी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईच्या दंगलीपासून म्हणजे 20 ते 25 वर्षापासून मला सुरक्षा देण्यात आली. परंतु या सरकारने माझी सगळी सुरक्षा काढून घेतली आहे. कोणत्या कारणांनी काढली, तसेच का काढली याबद्दल मला काही माहिती नाही. तसेच आता परत सुरक्षा मागणारही नाही. असंही ते म्हणाले.
“राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी मी बसतो, मग ते सामानाचं ऑफिस असेल, शिवसेना भवन असेल, किंवा माझं घर असेल. त्याठिकाणी मला काही होऊ शकतं. हे सरकारला माहिती असतानाही त्यांनी सुरक्षा काढली. त्याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळतंय. परंतु काहीही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही. अशी ठाम भूमिका देखील राऊतांनी घेतली आहे.
Read also
- “गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”
- पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
- पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप यशस्वी..! तब्बल 9 जागांवर मिळवला ताबा
- “आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल