मुंबई : मागील वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजणार आहे. कारण मंगळवारी रात्री राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचनेचा पारूप तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी महापालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.
“गुजरात प्रकल्प पळवतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय, अन् तरीही सरकार शांत”
काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार आणि इतर नेते उपस्थित होते. त्यांना उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही गोष्टीचं मार्गदर्शन करण्यात आलं. महापालिका आपल्याकडेच राहणार आहे. त्यामुळे जिंकण्यासाठीच आपण मैदानात उतरू. त्यामुळे आता तयारीला लागा. अशा सुचना त्यांनी दिल्या.
पहिले आमदार, नंतर प्रकल्प अन् आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले..! आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या तयारीच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात बैठक घेतली असून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सिनेटपासून ते इतर सर्व निवडणुकीत कसे काम करायचे याचे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. अशी माहिती मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
तीच गर्दी, तोच उत्साह…! ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात प्रवेश…
दरम्यान, प्रभाग रचना, तसेच ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यातच महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यातच आता आघाडी सरकारमधील तीन सदस्यीय प्रभागाची रचना बदलून शिंदे यांनी 2017 प्रमाणे चार सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे ठरविले आहेत.
Read also
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकांना सुट्टीचे आदेश..! अजित पवार म्हणाले, मी तर…
- “मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला
- “थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले…”राष्ट्रवादीचा खोचक टोला
- सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचे दोन व्हिडीओ केले ट्विट..! म्हणाल्या, “विरोधात असताना अन् सत्तेत”
- “जीव धोक्यात असतानाही सरकारने माझी सुरक्षा काढली, सरकार माझ्या जीवाशी खेळतंय”; संजय राऊत