पुणे: कुकडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसल्याचे कारण देत प्रकल्पातून आवर्तन सोडू नये, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणाऱ्या याचिकाकत्र्याने याचिका मागे घेतल्याने कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. येणाऱ्या २० मे २०२१ रोजी आवर्तन सोडण्यात येईल अशी माहिती आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार यांनी दिली दिली होती. राज्यातील कालवा सल्लागार समितीने ९ मे पासून कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात जुन्नरमधील प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सोमवार दिनांक १७ मे रोजी सुनावणी होती. मात्र सुनावणीपूर्वीच याचिकाकर्ते प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली होती.
कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी मोठ्या पप्रमाणावर शेतकरी वर्गाकडून करण्यात येत होती. यात पारनेर,श्रीगोंदा,कर्जत तसेच करमाळा (सोलापूर जिल्हा) तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने होते. या पार्शवभूमीवर पार पडलेल्या बैठकीत ९ मे पासून आवर्तन सोडण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र प्रशांत औटी यांनी याचिका दाखल केल्याने त्याला स्थिगिती मिळाली होती. यानंतर आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मध्यस्ती करत आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा केला.
आज २१ मी रोजी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. कुकडीचे आवर्तन सुटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कालच कुकडीच्या पाण्याकरता पारनेर तालुक्यात कुकडी संघर्ष समितीची स्थापना देखील झाली होती. पिकांना सध्या पाण्याची मोठी गरज होती. आमदार निलेश लंके आणि रोहित पवार यांनी विशेष पाठपुराव्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्यास मदत झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.