दिल्ली : बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. तर सध्या काँग्रेसच्या भावी अध्यक्षाच्या मुद्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अगोदर राहुल गांधी यांचे नाव समोर येत होते, मात्र आता प्रियंका गांधी यांचे नाव देखील पुढे येत आहे. या दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचं एक महत्वपूर्ण विधान समोर आलं, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं माझ्यासह ९९.९ टक्के काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज(शनिवार) १० जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
काँग्रसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य हे या पदासाठी जो योग्य आहे त्याची निवड करतील. माझ्यासह काँग्रेसच्या ९९.९ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत. असं सुरजेवाला यांनी म्हटलं असल्याचं एएनआयाने वृत्त दिलं आहे.
Party will soon start the procedure to elect a new party president. Electoral college of Congress, AICC members, Congress workers & members will choose who's best suited. 99.9% of people including me want Rahul Gandhi to be elected as party president: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/FHlybFgcKK
— ANI (@ANI) December 18, 2020
भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM) संमेलनात ते बोलत होते. तसेच, करोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
तसेच, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी आमचे मॅन्युफॅक्चरिंगवर विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत असल्याचंही मोदी म्हणाले.
Read Also :
आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” संजय राऊतांना खरमरीत पत्र
‘लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची’