मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात अनेक अडथळे आहेत. 9 ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. कोरोना संकटात यातच या महत्त्वाच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.
या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली असून, राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा 1 मेनंतर घेण्याचे विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षा गायकडवाड म्हणाल्या की, सीबीएसईने मे महिन्यात परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. राज्यातील बोर्डाच्या परीक्षांबाबत चाचपणी सुरू आहे. आम्हीदेखील 15 एप्रिलनंतर बारावीच्या आणि 1 मेनंतर दहावीच्या परीक्षा घेण्याच्या विचारात आहोत.
सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.