सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांकडून ३ दिवसांमध्ये उत्तर मागितले आहे. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीमध्ये अजूनपर्यंत काय झालं? हे मुंबई पोलिसांनी सांगावे , असेही सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे. याचसोबत सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांनाही त्यांचा रिपोर्ट द्यायचे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या अटक रोखण्याबाबत काहीही भाष्यं केलेलं नाही. सोबतच कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी पुढच्या आठवड्यापर्यंत स्थगित केली आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या बिहार सरकारच्या मागणीला केंद्र सरकारने समर्थन केले . मुंबई पोलिसांचा तपास सुरू असल्यामुळे तपास सीबीआयकडे द्यायला रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी विरोध केला. बिहार पोलीस राजकीय दबावापोटी काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला. तसं या प्रकरणात बिहार पोलिसांच्या हस्तक्षेपाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला. पुराव्यात छेडछाड केल्याचा सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आरोप केला आहे.