मुंबई: कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका कोरोनाकाळातच झाल्या होत्या याचा विसर खासदार संजय राऊत यांना पडलेला दिसतोय, पवारांसोबत राहून खासदार संजय राऊतांना कोलांटउड्या मारायची सवय झाली आहे असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.
कोरोनाकाळात बिहारच्या निवडणुका केंद्र सरकार रेटत आहे असा आरोप काल संजय राऊत यांनी भाजपवर केला होता. लालूप्रसाद यादव सध्या रुग्णालयात आहेत. कॉंग्रेसचे तिथे फार काही आस्तित्व नाही. अशावेळी संयुक्त जनता दल आणि भाजप एकतर्फी निवडणुका लढणार का? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. लोकशाहीत शंकांचा विचार न करता लोकशाहीचे पालन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अस मत खा.संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. बिहारमध्ये फक्त जात धर्म मुद्दा असतो बर्याच वेळा तिथे गरिबी बेरोजगारी हा मुद्दा नसतो,नितीशकुमार हे मागील 24 वर्ष मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड राग आहे आता तिथ विरोधकांची किती ऐकी होते यावरही खूप काही गोष्टी अवलंबून आहे. असही राऊत यांनी म्हटलं होतं
दरम्यान अभिनेत्री कंगणा रनौत विरुद्ध शिवसेना संघर्षावरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मोठ्या प्रमाणात टिकाटीप्पण्णी झाली होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. तीच परिस्थिती कंगणाचं घर पाडल्यानंतर आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुनही बघायला मिळाली आहे.