मुंबई : मुंबई मेट्रोसाठी कारशेड उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरची जागा उपलब्ध करून दिल्यावर आता त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे, याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरे ची जागा कारशेडसाठी दिली होती, पण त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध करत कारशेडचं काम बंद पाडले होते.
आता त्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे, अडकवणे, भटकवणे आणि लटकवणे हीच आघाडी तिघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कांजुरमार्गाची जागा ताब्यात घेताना मिठागर आयुक्तांची परवानगी घ्या, असं आम्ही म्हटलं होत पण त्यांनी ऐकलं नाही. या आघाडी तिघाडी सरकारची कार्यपद्धती हि निव्वळ लटकावण्याची आहे, असं हि शेलारांनी म्हटलं आहे.
तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा!
मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. pic.twitter.com/Q9RLtedO13— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2020
केंद्र सरकारला कोणी काही सांगतय का? मुंबई उपनगरांची हि कनेक्टिव्हिटी आहे, आणी आरे हे जंगल आहे, राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्यांनी आपले शपथपत्र दाखल केले आहे, पण आता काय निर्णय घ्यायचा तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका महापौर पेडणेकर यांनी घेतली आहे.
Read Also :
मेट्रो कारशेडवरुन आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार रंगणार वाद
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार- मंत्री प्राजक्त तनपूरे
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका