मुंबई : मुंबई मेट्रोसाठी कारशेड उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरची जागा उपलब्ध करून दिल्यावर आता त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे, याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरे ची जागा कारशेडसाठी दिली होती, पण त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध करत कारशेडचं काम बंद पाडले होते.
पण आता केंद्र सरकाने यासंबंधीची एक नोटीस महाविकास आघाडी सरकारला दिली आहे, त्यामध्ये कांजूरची जागा हि केंद्रसरकारची असून त्यावर सरकारने हक्क सांगू नये अस त्यात म्हटलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याची सूचना केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार किंवा भगतसिंग कोश्यारी विरुध्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मोठे वाद रंगले होते. पण आता मुंबई मेट्रोवरुन ते वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोसाठी आरेची जागा ही उपलब्ध करून दिली होती. पण आता महाराष्ट्रात सरकारबदल झाल्यानंतर फडणवीसांच्या त्या निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात आली होती.
Read Also :
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार- मंत्री प्राजक्त तनपूरे
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका
आमदार रोहित पवार यांचे जामखेडवासी भयभीत; काय आहे कारण?
भारत ऑस्ट्रियासोबत ; दहशतवादी हल्ल्याचा मोदींकडून निषेध