नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी 31 डिसेंबरला राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता रजनीकांत यांनी पुन्हा एकदा आपण राजकारणापासून लांब राहणार असल्याचे म्हटले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न जाण्याचा आपण निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रजनीकांत राजकीय पक्षाची स्थापना करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र आता त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना करणार म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वीच त्यांना रक्तदाब उच्च होत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 27 डिसेंबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
आपल्या निर्णयाविषयी माहिती देताना रजनीकांत म्हणाले की, मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाही. पण तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध माध्यमातून काम सुरुच राहील. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. याशिवाय, या निर्णयामागे मला ‘बळीचा बकरा’ बनविल्याच मत तयार करुन घेण्याचा गैरसमज कुणी करुन घेऊ नये.
दरम्यान, याआधी देखील रजनीकांत यांनी दोनदा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दोन्ही वेळा त्यांनी माघार घेतली होती.