मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर लावलेल्या आरोपांवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एम्सचा रिपोर्ट साधार झाल्यावर देशमुखांनी टीका केली आहे.
‘ सुशांत सिंग प्रकारणात मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला मात्र त्यांच्यावर विनाकारण आरोप लावण्यात आले . केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणाचा वापर केला असून बिहार निवडणुकीसाठी सुशांत आत्महत्या प्रकरणाचे राजकरण केले , अशी टीका अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान सुशांतच्या कुटूंबाने पूर्वी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची नावे ड्रग्सशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. तर श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.
Read Also :
माझ्यासह पवार साहेब,आदित्य ठाकरे आणि CM ठाकरेंनाही आयकर विभागाची नोटीस : सुप्रिया सुळेhttps://t.co/E1LjggxUG3#SharadPawar #SupriyaSule #AdityaThackarey #UddhavThackarey #Shivsena #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020