मुंबई – मुंबई कर्नाटकचा भाग म्हणणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्यायला हवं, अशी टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलीय. मराठी बहुभाषक लोकांचा आदर करत सामंजस्याने कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न सोडवावा, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले होते. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्याच विधानावरून विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली. त्यामुळे आता शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सवदी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली. त्यामुळे आता शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान सवदी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.