मुंबई : आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुन्हा निवडणूक घेतली तर भाजप निवडून येईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. मी महाराष्ट्रात काम पाहतो, मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना बिहारमध्ये गेलो होतो म्हणून नितीशकुमारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मी मत मांडणं योग्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
पुणे पदवीधर भाजपची परंपरागत सीट संग्राम देशमुख युवकासंबंधीच्या अनेक संस्था ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, पदवीधर आमदार असताना मी अनेक गोष्टी केल्या आहेत. संग्राम देशमुख यांच्यासह आमचे तीन पदवीधर, असे सगळे उमेदवार शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी भांडतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. यासंबंधी जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे.
Read Also :
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका
…म्हणून जयंत पाटलांनी ‘तेजस्वी यादवां’वर उधळली स्तुतिसुमने
आता मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, भाजप आमदार आशिष शेलारांचे संकेत