मुंबई :महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला धक्का दिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात ग्रामपंचायती हद्दीतील घर बांधनीचा परवाना ग्रामपंचायत सरपंचासबोत इतर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज लागायची मात्र आता ठाकरे सरकारने हे निर्णय बदलेले आहे.
त्यामुळे आता घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.फडणवीस सरकारच्या घर बांधणी परवानगीच्या निर्णयाला तेव्हा लोकप्रतिनिधींनीही विरोध केला होता. तसेच, गावागावात बांधकाम परवानगीसाठीही नागरिकांना अडचणी येत होत्या. दरम्यान ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आहे. त्यात आरे कारशेड, जलयुक्त शिवार योजना, हायपरलूप प्रकल्प व शिक्षक बदली अशा अनेक निर्णयांना ठाकरे सरकारकडून स्थगिती मिळाली आहे
Read Also :
तुझ्याशी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, हे सरकार आहे की सर्कस हेच कळेनासं झालंय…
एकनाथ खडसे हे मोठे नेते त्यांची ताकद ही संपूर्ण महाराष्ट्रात : गृहमंत्री अनिल देशमुख