मुंबईतील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 24 जणांना ढिगाऱ्याघालून सुखरुप काढण्यात आलं आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही भानुशाली इमारत येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकरांनी मुंबई महानगर पालिका आणि सरकारच्या नियोजनेवर टीका केली आहे
““पाऊस अचानक येत नाही, तो ठरलेला असतो. पण एक पावसाळा असा गेला नाही, की ज्या पावसाळ्यात इमारत कोसळत नाही किंवा कुणाचा मृत्यू झाला नाही. मनपा, म्हाडाला एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या. गांभिर्याने जी काळजी घ्यायला हवी, ती झाली नाही. इंटिग्रेटेड प्रोग्राम बनवा. मुंबई उपनगरात ज्या धोकादायक इमारती आहेत, त्याबाबत आढावा घ्या. पुनर्वसनाची व्यवस्था करा. मुंबई मनपा, म्हाडा आणि सरकारने एका आठवड्यात हे जाहीर करावं. या संदर्भात नियोजन विहायला हवं होतं, पण सरकारने ते केलं नाही. सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला हवी होती, ती घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने हे सगळं घडलं”, अशी टीका प्रवीण दरेकरांनी सरकार आणि मनपावर केली आहे.