देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताच इंटर्नशिप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र केंद्रीय परिषदेने यास नकार दिल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
अमित देशमुख यांनी सांगितले की, केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या 31 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीत राज्य सरकार आपली आपली बाजू मांडणार आहे.
राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टर्नशिप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. अमित देशमुख पुढे म्हणाले की, “राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताच कालापव्यय टाळण्यासाठी इंटर्नशिप सुरू करून परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
आता 31 तारखेला न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांन सांगितले.