नाशिक – नाशिक येथे होणाऱ्या ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रणावरून राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सर्व राजकीय पक्षांना संमेलनात सहभागी करून घ्यावे, असे महापैार सतीश कुलकर्णी म्हणाले होते. संमेलनतोंडावर आले असताना भाजपा नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोपानंतर नवा राजकीय वाद उफाळून आला होता. त्यानंतर साहित्य संमेलनाच्या निमंत्रणाबाबत भाजपा नेते आणि महापौरांची नाराजी दूर केली असल्याचे पालकमंत्री आणि संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून देवेंद्र फडणवीसांच नाव वगळलं; नाशिकच्या महापौरांनी टाकला बहिष्कार
मराठी साहित्य संमेलनाला महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना निमंत्रित केले आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणही दिले नव्हते. संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपाच्या आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेखही नाही. भाजपा नेत्यांना निमंत्रण न दिल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले असून त्यांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली असून अखेर देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर आता फडणवीसांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनीही संमेलनाला येणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे. मात्र महापौर कुलकर्णी आणि फडणवीस संमेलनात सहभागी होतात का? हे शुक्रवारी संमेलनात दिसून येईल. नाशिक महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. महापालिकेनेही संमेलनासाठी २५ लाखांचा निधी दिली आहे.
एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ऑनलाइनच्या माध्यमातून हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार समारोप कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार तर संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे संमेलनात सहभागी होणार आहे.
Read Also :
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
- कोरोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; परराज्यातून येणाऱ्यांसाठी आणि शाळांबद्दल म्हणाले…
- रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
- “काँग्रेस कधी उटांसारखी तिरकी चालत नाही”; ममतांच्या दौऱ्यावरून अशोक चव्हाणांनी झापले
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, परमबीर यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा..