मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला आहे . मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्दयावर चर्चा झाली असं देखील बोलण्यात येत होतं.
अजित पवारांनी MPSCच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल केली, सदस्य नियुक्तीबाबत सरकार उदासीन – पडळकर
यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होती कि युपीए आता आहेच कुठे?.परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला होता.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष काहीसा नाराज झालेला दिसत आहे आणि काँग्रेस पक्षातील नेते आपली नाराजी तीव्र शब्दांमध्ये व्यक्त करत आहेत आणि टीका करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आता ममतांच्या दौऱ्यावरून टीकेचे बाण सोडले आहेत.
काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत का?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुखांचा एक कविता म्हणत असतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही. अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली,” असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एवढंच नाही तर भारताच्या राजकारणाचं वास्तव आता सर्व देशवासीयांच्या समोर आहे. भारतात काँग्रेसशिवाय भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, परमबीर यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा..
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
- वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही – बाळासाहेब थोरात
- मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला