मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या मुंबईत तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त त्या काँग्रेसला डिवचून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या भेट घेत आहे. महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे सरकार आहे, ज्यात काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीला स्पष्ट महत्त्व दिले आहे आणि काँग्रेसला मात्र बाजूला सारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात काय नवीन राजकीय समीकरणं होणार आहेत याच्याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
कधीकाळी काँग्रेस आणि ममता बनर्जी यांचे मैत्रीपुर्ण संबंध होते. भारतात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते, ज्यात काँग्रेस आणि तृणमूल आघाडीवर होते. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तृणमूलसोबत युती केली नसली तरी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
मात्र आता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे, भाजपला केंद्रातील सत्तेतून बाहेर काढण्यासाठी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांना बाजूला सोडून, ममता बॅनर्जी देशाला तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं चित्र सध्या तरी दिसत आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात ममतांनी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. शिवाय अनेक काँग्रेसचे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. दरम्यान, दिल्लीमध्ये मीडियाने जेव्हा ममता बॅनर्जींना विचारले की त्या सोनिया गांधींना भेटणार का, तेव्हा त्या खूप संतापल्या आणि म्हणाल्या की सोनिया गांधी व्यस्त आहेत. मात्र ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडण्यामागील कारण नेमके काय आहे? हे अद्याप स्पष्ट नाही.
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
आज ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या संपूर्ण वेळापत्रकात कुठेही काँग्रेस पक्षाचा उल्लेख नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोडी आणि समीकरणे काय असतील? तसेच दुसरी बाजू अशी जर देशात काँग्रेसला बाजूला सारत ममतादीदींनी तिसरी आघाडी तयार केली. तर, महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत फूट पडणार हे निश्चित.. आणि महारष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार हे हि तितकंच खरं,, मात्र या महविकासआघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय निर्णय घेतील यावरच सर्व अवलंबून आहे असे म्हणता येईल.
Read Also :
- रांगोळी, तोरणे… रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली; भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची नाराजी
- दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
- हिवाळी अधिवेशन: पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील भास्कर जाधव नावाचं अस्त्र गाजणार का?
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार