कोल्हापूर : महाराष्ट्रात मागील आठवड्यात ६ विधानपरिषदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापुरातील लढतीकडे महाराष्ट्रातील सर्वांचेच लक्ष लागले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात संघर्ष होणार होता. मात्र जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनी यामध्ये मध्यस्ती केल्याने हा संघर्ष वेळीच टळला.
आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
आता पुन्हा एकदा कोल्हापुरात राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी बहुमत असले तरी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सहमतीने बँकेचा कारभार केला आहे.
अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
गेल्या निवडणुकीपूर्वी बँक अवसायानातून बाहेर पडल्यावर हसन मुश्रीफ यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला होता. आता पुन्हा एकदा मुश्रीफ, बंटी पाटील, विनय कोरे हे मिळून जिल्हा बँक बिनविरोध करणार का ? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आणि पहिल्याच दिवशी नेत्यांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातून तर मंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील यांनी शिरोळमधून अर्ज भरला आहे.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचा मुलगा बँकेचे संचालक रणजित पाटील, शाहूवाडीतून संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला गटातून संचालक माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे, कृषी व पणन या गटातून खासदार संजय मंडलिक, संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, इतर शेती विभागातुन संचालक भैय्या माने, ओबीसी गटात संचालक असिफ फरास, विलासराव गाताडे यांनी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याची शेवटची तारीख तीन डिसेंबर असून पाच जानेवारी २०२२ रोजी निवडणूक होणार आहे. २१ जागांसाठी निवडणूक होत असून बारा तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातून प्रत्येकी एक असे १२ संचालक निवडून येणार आहे. इतर गटातून नऊ संचालक निवडून द्यावयाचे आहेत.
Read Also :
- कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावनी; आमदार महेश लांडगे यांची माहिती
- दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश