मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मुंबईत ट्रा यडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाली असं देखील बोलण्यात येत होतं.
वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होती कि युपीए आता आहेच कुठे?.परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला होता.
“आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि गांधी परिवारावर भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांकडून वैयक्तिक हल्ले करण्यात आले होते. त्यांच्या बदनामीसाठी काहींनी मोहीमा देखील चालवल्या होत्या.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
मात्र राहुलजींनी माघार घेतली नाही. देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले आणि अजूनही लढत आहेत. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात, अशी विचारणा बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Read Also :
- मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- कोल्हापूरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे पहाटे निधन
- ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अवमान; भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
- चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो