मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नुकत्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मुंबईत ट्रा यडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा झाली असं देखील बोलण्यात येत होतं.
ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
यानंतर त्यांनी मुंबईत सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ‘जय मराठा जय बांगला’ असा नारा दिला होता. त्यांनी हा नारा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी
यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली होती. पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण महाराष्ट्रातील उद्योगांना, दीदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का?” असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावर आता शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शेलार यांचा खरपूस समाचार घेतला आहे आणि भाजपवर देखील टीका केली आहे. हे. शेलार यांच्या पश्चिम बंगालवरील टीकेला संजय राऊत यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाची आठवण करून देत उत्तर दिलंय.
“आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतींना भेटायला आल्या तर काहींच्या पोटशूळ उठला आहे. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात असा सूर काही नेत्यांनी आवळलाय. मात्र, आज व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी गुजरातचे मुख्यमंत्री अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो देखील होतोय, याची आठवण खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून दिलीय. तसेच, मुंबईला ओरबाडून आत्मनिर्भर गुजरात करणार का ? असे म्हणत मुंबईच्या उद्योजकांवर गुजरात उभारत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
Read Also :
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- कोल्हापूरचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे पहाटे निधन
- ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अवमान; भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
- चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो
- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..