कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज सकाळी पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
“आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
चंद्रकांत जाधव हे २०१९च्या विधानसभेच्या वेळी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते आणि जिंकले होते. त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवूनही त्यांनी विजय मिळवला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक जण बांधणार ‘घड्याळ’
एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळवला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती. मागच्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती . त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते . मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते . मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले .
ममता बॅनर्जींची सिल्हर ओक’वर हजेरी; भेटीनंतर शरद पवारांनी सांगितली २०२४ ची रणनिती
आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते . हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती . शस्त्रक्रिया यशस्वी झाली , परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. आपल्या दोन-अडीच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या तसेच उदयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मतदारसंघातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.
Read Also :
- ममता बॅनर्जींनी केला राष्ट्रगीताचा अवमान; भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
- चिंता वाढली: ओमिक्रॉन आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो
- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
- “आता UPA राहिलेली नाही, फक्त जाहीर करायचं बाकी”; ममताजींची काँग्रेसवर जोरदार टीका
- वीज काय फुकटात तयार होते का? वीज बिल भरावचं लागेलं; उर्जामंत्र्याची शेतकऱ्यांना तंबी