मुंबई – तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेला रामराम करून सूर्यकांत दळवी यांनी ‘घड्याळ’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दळवी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी भवनात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेकडून सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र आपल्याला शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी म्हणजे पांढऱ्या पायाचे अपशकुनी सरकार; विनायक मेटेंची सडकून टीका
दळवी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने सुनील तटकरे यांच्या दापोलीत पक्षाची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे. दळवी यांच्यासोबतच दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, शांताराम पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, प्रदेश युवा सेना पदाधिकारी ऋषिकेश गुजर आदींसह अनेक शिवसेना नेते राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे कोकणामध्ये शिवसेनेच्या विस्तारासाठी झटलो. तसेच पक्षाने विधानसभा निवडणुकीत संधी दिली व मी आमदार झालो. तब्बल पाच वेळा आमदार झाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे मला पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याचे दळवी म्हणाले. पराभव कसा व कोणामुळे झाला हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर पक्षाकडून सातत्याने डावलले आहे. मला अपमानास्पद वागणूक मिळाली. याच कारणाने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दळवी म्हणाले.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने पक्ष संपवला; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
दापोलीच्या राजकारणात सूर्यकांत दळवी आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम हे दोन्ही नेते शिवसेनेचे असले तरी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद आहेत. कदम यांनी विधानसभेसाठी आपले चिरंजीव योगेश कदम यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ते दापोली मतदारसंघात २०१९ मध्ये निवडून आणले होते. या निवडणुकीपूर्वी नाराज सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत यात शंका होती . मात्र आता ते राष्ट्रवादी जाणार असल्याचे समोर आले आहे.
दळवी कधी पक्ष सोडून जातील, याकडे शिवसेनेच्या काही नेत्यांचे लक्ष होते. हे पाहता दळवी हे शिवसेनेत तसेच राजकारणात सक्रिय नव्हते. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील संभाषणाची कथित क्लिप बाहेर आली. हीच संधी साधत दळवी यांनी कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.
Read Also :
- शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !
- ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?
- “ममताजी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायेत आणि शिवसेना मदत करतेय का?”
- एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
- “मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?”