मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात असल्यानं त्यांची भेट घेता आली नाही. मात्र मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. मंगळवारी झालेल्या या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तर दुसरीकडे या भेटीवरून आणि चर्चेवरून भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
नाकर्तेपणाचे पाप झाकण्यासाठीच कोरोनावर खापर फोडलं; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना पत्र
भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यांनी म्हटलं की,’ममता दिदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय. पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही पण…’ या ट्विटनंतर शेलार यांनी काही प्रश्न विचारले आहेत. ममता दिदी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायत का? इथले उद्योग तिकडे नेण्यास शिवसेना मदत करतेय का? इथल्या तरुणांना मग शिवसेना फक्त वडापाव विकायला लावणार का? असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहे.
महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास शिवसेना मदत करते काय? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/afuBYkD6TP
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 1, 2021
“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या मुंबईत तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त त्या काँग्रेसला डिवचून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या भेट घेत आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर जशा राजकीय भेटी आहेत तशाच काही व्यावसायिक भेटीही आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिट आहे. त्यानिमित्तानं ममता बॅनर्जी मुंबईतल्या बड्या व्यावसायिकांना निमंत्रण देणार आहेत. ती समिट बॅनर्जींसाठी महत्वाची आहे. त्यामुळेच राजकीय भेटींसोबतच व्यावसायिकांसोबतच्या भेटीवर लक्ष असेल.
Read Also :
- एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
- “मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?”
- साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून देवेंद्र फडणवीसांच नाव वगळलं; नाशिकच्या महापौरांनी टाकला बहिष्कार
- ‘केवळ नाव राष्ट्रवादी…’, भास्कर जाधवांचा तटकरेंवर हल्लाबोल
- काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत का?