रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे आणि गुहागर विधानसभा मतदार संघाचे यांच्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी या भास्कर जाधवांच्या मागणीमुळे सुनील तटकरे आणि जाधव यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्यानंतर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार कोल्हे विरुद्ध आमदार लांडगे संघर्ष पेटणार!
केवळ नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर हल्ला चढवलाय. सुनील तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन केल्याच्या नावाखाली लोकांच्या हजारो एकर जमीनी लाटल्याचे आरोप आहे. 10 ते 15 हजार कोटींची बेहिशेबी माया गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहेत. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा टोला जाधव यांनी लगावलाय. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण, जाणीव आणि नीतिमत्ता लागते आणि सुनिल तटकरे यांच्याकडे यातलं काहीच नाही. तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं माहीत नाही, अशा शब्दात जाधव यांनी तटकरेंवर हल्ला चढवला.
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
सुनिल तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. पण माझ्या कोणत्याही विजयात सुनील तटकरे यांचं योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी अनेक ठिकाणी काड्या केल्या. त्यांना मदत करणाऱ्यांचंच तटकरे यांनी कायम वाटोळं केलं, असा आरोप करताना जाधव यांनी दिवंगत आमदार माणिकराव जगताप, बॅरिस्टर अंतुले यांचं उदाहरण दिलं. तटकरे स्वतःला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा फाऊंडर मेंबर म्हणवतात, पण ते सत्य नाही. सुनील तटकरे हे मूळचे कॉग्रेसचे आहेत, असंही जाधव म्हणाले
Read Also :
- काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत का?
- रांगोळी, तोरणे… रिक्षावालेकाका, शिक्षक सर्वांचीच तयारी वाया गेली; भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची नाराजी
- दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी राष्ट्रवादीच्या जहाजात? योगेश कदमांना निर्माण होणार मोठे आव्हान
- हिवाळी अधिवेशन: पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील भास्कर जाधव नावाचं अस्त्र गाजणार का?
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार