मुंबई – भाजपा आमदार नितेश राणे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारसह नेत्यांवर टीका करत असतात. आता त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात नितेश राणे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये अपयश आल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपले जवळचे लोक गमावल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकार व मुंबईतील सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनशून्य कारभार व अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण हे सरकार पूर्ण करु शकले नाही. अशा शब्दात नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
12 देशांतून आलेल्या नागरिकांना 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक राहणार – राजेश टोपे
“दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत पहिल्या फळीतील कर्मचारी, कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली.” असे नितेश राणे म्हणाले आहेत.
नितेश राणे पत्रात पुढे म्हणाले की, “आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलनं करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आलेला नाही.”
“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी का?”
आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं करोनावर फोडायचं आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे, हे अत्यंत निंदनिय आहे, असेदेखील राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/LovI6USL4H
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2021
Read Also :
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
- महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
- कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
- कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष