नवी दिल्ली – राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही विरोधकांनी सभात्याग केला आहे. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार देत सांगितलं की, ”12 खासदारांचं निलंबन नियमानुसार करण्यात आलं आहे. विरोधकांनी आज चर्चा करावी किंवा सभात्याग करावा.”
…आणि अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर !
खासदारांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर हल्लाबोल करताना म्हटलं की, ”सरकारचा धमकावण्याचा हा नवा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सरकार बळजबरीनं माफी का मागायला लावतं आहे ? सरकारची अशी वृत्ती पहिल्यांदाच पाहिली.”
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत म्हटलं की, “आम्ही 12 खासदारांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलो होतो. घटना गेल्या पावसाळ्यातील आहे. मग आता हा निर्णय कसा घेण्यात येऊ शकतो?”
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
व्यंकय्या नायडू यांनी यावेळी म्हटलं की, ”गेल्या पावसाळी अधिवेशनातील वाईट अनुभव अजूनही आपल्यापैकी बहुतेकांना सतावतो. गेल्या अधिवेशनात जे काही घडले त्याबद्दल सभागृहातील प्रमुख नेते नाराजी व्यक्त करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आणि वाट पाहत होतो. राज्यसभेच्या अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि सभागृहही कारवाई करू शकते.”
Read Also :
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
- महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
- कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
- कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावनी; आमदार महेश लांडगे यांची माहिती