जालना : डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्येत आज चांगली असून ही व्यक्ती पॉझिटीव्ह आढलून आली आहे. या व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी देण्यात आले आहे. याबाबतची कारवाई उद्यापर्यंत पुर्ण केली जाणार आहे. त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओमिक्रोन संदर्भात चर्चा झाली असून अमेरिका,सौदी अरेबिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युरोपिय समुदाय, कॅनडा यासह आणखी ५ देशातून आलेल्या नागरिकांना 48 तास आधीचं RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक असणार आहे.
मुंबईच्या गुंडगिरीला ‘सातारी हिसका’ सोसणार नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा शशिकांत शिंदेंना गर्भित इशारा
शिवाय दोन डोस घेणं बंधनकारक राहणार असल्याचे टोपे यांनी म्हटलं आहे. 12 देशातून आलेल्या नागरिकांना 7 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते. आंतरराष्ट्रीय विमानतलावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा याबाबत देखील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याच टोपे म्हणाले. या 12 देशा व्यतिरीक्त ईतर देशातून आलेल्या नागरिकांना RTPCR चाचणी बंधनकारक करायच्या का याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.
मागच्या दोन वर्षात महाराष्ट्र २० वर्षे मागे गेला; प्रविण दरेकरांचा आरोप
शहरात पूर्वी बंद असलेल्या शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नसल्यची माहिती राजेश टोपे दिली.
Read Also :
- …आणि अखेर तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर !
- ‘केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- ‘१ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?’; राजेश टोपे म्हणाले…
- महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच पर्दाफाश..
- बालेवाडी प्रीमियर लीग’मधे “साईकृपा संघ”चा ठरला विजय; लहु बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन