मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने गेल्या २८ तारखेला दोन वर्ष पूर्ण केली. यानिमीत्ताने सर्व मंत्री सरकारने आतापर्यंत केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने मात्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलंय. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका करताना गेल्या २ वर्षांत महाराष्ट्र २० वर्ष मागे गेल्याचं म्हटलं आहे.
संपाचा हट्ट जर कायम असेल तर नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी – संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आपण बघितला आहे. भ्रष्टाचाराचा एकही डाग न लावून घेतलेलं ते सरकार होतं. परंतू गेल्या २ वर्षांत महाराष्ट्र २० वर्ष मागे गेला आहे. अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. या सरकारमधील अर्ध्या मंत्रीमंडळावर डाग आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षांतली महाराष्ट्र सरकारची ही उपलब्धी आहे असं म्हणत दरेकरांनी सरकारला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने सरकारने केलेल्या जाहीरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेने सरकारला आपलं मानल्याचं म्हटलं आहे. परंतू सरकारने जनतेलं आपलं मानलेलं दिसत नाही असंही दरेकर म्हणाले. गेल्या दोन वर्षांत राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नसल्याचा टोलागी दरेकरांनी लगावला. आगामी काळात निश्चीतपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याची ग्वाहीही दरेकरांनी दिली. काही दिवसांपूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विवादास्पद वक्तव्याबद्दल दरेकरांनी त्यांना सल्ला दिला आहे. “आव्हाड वादग्रस्त विधान करुन वातावरण खराब करतात. ते आता मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारीने वागावं.”
Read Also :
- ‘१ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?’; राजेश टोपे म्हणाले…
- महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच पर्दाफाश..
- बालेवाडी प्रीमियर लीग’मधे “साईकृपा संघ”चा ठरला विजय; लहु बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
- आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
- चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय हायकमांड नाराज, महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात अपयशी – सूत्र