मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी सिल्व्हर ओक येथे दाखल झाल्या आहेत. थोड्याचवेळात पवारांच्या घरी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सिल्व्हर ओक येथे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील उपस्थित असून यामध्ये धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक आदी नेते मंडळी दाखल झाल्याचे पाहण्या मिळत आहे.
नाकर्तेपणाचे पाप झाकण्यासाठीच कोरोनावर खापर फोडलं; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना पत्र
ममता बॅनर्जी यांनी कालच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात बैठकीला सुरुवात झाली असून यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.
“उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
शरद पवार यांच्या भेटीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी उपस्थितांशी मराठीतून संवाद साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राती सर्व जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!” त्यांच्या या संवादानंतर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला. यावेळी सभागृहात जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर उपस्थित होते.
काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत का?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर ममता बनर्जी तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवारांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Read Also :
- “ममताजी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायेत आणि शिवसेना मदत करतेय का?”
- एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
- “मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?”
- साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून देवेंद्र फडणवीसांच नाव वगळलं; नाशिकच्या महापौरांनी टाकला बहिष्कार
- ‘केवळ नाव राष्ट्रवादी…’, भास्कर जाधवांचा तटकरेंवर हल्लाबोल