मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा केली आहे. पाडव्यापासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळं उघडण्यात येणार आहे. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने आंदोलने केली होती. मंदिरे उघडण्याच्या निर्णयानंतर उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले, असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्य वेळीच घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
The decision has come at the right time when the number of corona patients is low. The rules will be the same for all the religious places. The use of masks, sanitizers would be mandatory. Social distancing is very important: Jayant Patil, Maharashtra minister https://t.co/frUuX2jVlI pic.twitter.com/z2KaflivCf
— ANI (@ANI) November 14, 2020
जयंत पाटील म्हणाले की, कोरोना रूग्णांची संख्या कमी असताना योग्य वेळी निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धार्मिकस्थळांसाठी नियम सारखेच असतील. मास्क व सॅनिटाइझरचा वापर बंधनकारक असेल, सोशल डिस्टंसिंग हे अत्यंत महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळ सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. अखेर मागण्यांची दखल घेत सरकारने दिवाळीच्या निमित्ताने मोठा निर्णय घेतला.