पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारणाला ऊत आलेला दिसत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी एकमेकांच्या विरोधात बंड पुकारले आहे. गोव्यात सर्वच राजकीय पक्ष उतरले असले तरी खरी लढत सर्व पक्षीय विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच होणार आहे. भाजपची सध्या गोव्यात सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे प्रभारी म्हणून अत्यंत चांगले काम करत आहेत.
नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
दिवंगत मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे निर्माते आहेत. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रांत विकासाला चालना दिली’, असे प्रतिपादन भाजप गोवा प्रभारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे.
एक झंझावती युगं संपलं; गानकोकिळा लता मंगेशकर यांच निधन, देशावर शोककळा
आप आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष हे गोव्यात फक्त पर्यटन बघायला आले आहेत आणि या पक्षांचे पार्सल आता गोव्यातील जनतेने घरी पाठवावे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी हाणला आहे. मागच्या १० वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास झाला आहे. पुढील पाच वर्षे गोवा राज्याच्या समृद्धीची असणार आहेत. यामुळेच सध्या गोव्यात परिवर्तन घडून येण्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपसोबत राहण्याचे आवाहन गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Read also:
- उदयनराजेंच्या दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे सातारा एमआयडीसीची वाढ होईना; शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप
- म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर
- महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे
- महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये – नाईक
- स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे