मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठा भुकंप आला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकास आघाडी सरकार असताना अनेकदा चर्चेत येत होते. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांनी शांततेची भूमिका घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी टोला हाणला आहे.
“बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आलो, लोक म्हणतात यांचे डिपॉझिट जप्त होणार”
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना या ना त्या कारणांमुळे राज्यपाल चर्चेत येत होते. राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा वाद अनेकदा बघायला मिळत होता. परंतु ज्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. तशापासून राज्यपाल शांत झालेत. यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बऱ्याच कामात आडवे येणारे राज्यपाल कोश्यारीजी शिंदे सरकार आल्यापासून रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात. असा टोला सुरज चव्हाण यांनी लगावला.
माझी निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी”; ऋतुजा लटकेंनी विरोधकांना सुनावलं खडेबोल
महाविकास आघाडीच्या काळात राज्यपालांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलीत. त्याला भाजपने देखील पाठिंबा दिला होता. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने राज्यात राज्यपाल सातत्याने चर्चेत राहत होते. परंतु आता राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आणि राज्यपाल देखील त्यांच्याच विचारसरणीचा असल्याने राज्यपालांची भूमिका आता काहीसी बदलताना दिसत आहे.
Read also
- “अनिल परबांचा डाव ओळखावा..”! मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट
- “लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”
- “पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
- “अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील