मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तसंच, आगामी लोकसभा निवडणूक इंडियाअंतर्गतच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा…कॅगकडून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील हे ७ घोटाळे उघड”
बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्र पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसंच, ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्वे केला होता. या सर्वेचं परीक्षण या बैठकीत करण्यात आलं. लोकसभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करणं हाच आमचा प्लान बी आहे.
हेही वाचा…“पुढचा स्वांतत्र्या दिनाचा सोहळा मोदी माजी पंतप्रधान म्हणून गुजरातच्या घरी पाहतील”
दरम्यान, ऐकीकडे इंडियाची बैठक मुंबईत होत असून दुसरीकडे शरद पवार अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता काॅंग्रेस आणि ठाकरे गट पवारांशिवाय निवडणुका लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर कालच शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला
हेही वाचा…कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची टिका, अजित पवार भेट, शरद पवारांनी मांडली आपली भूमिका