अकोला : आजपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. प्रशासनाकडून यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी, अशी मागणी सातत्याने पुढे येतान दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमांसमोर लस घ्यावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भाजपचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी मीडियासमोर लस टोचून घ्यावी, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
सर्वात प्रथम मोदींनी लस टोचून घ्यावी, ही राष्ट्रवादीची मागणी काही नवीन नाही. याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे 20,000 डोसेस प्राप्त झाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
Read Also :
- ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान
- शेतकरी रस्त्यावर उतरणार, 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आंदोलन
- ‘… म्हणून मी एवढे दिवस गप्प होते’, मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने सांगितले कारण
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन, भाजप आक्रमक
- धनंजय मुंडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका, केली ‘ही’ मागणी