मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका काल पार पडल्या. या निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान झाल्याची माहिती, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते.
दरम्यान, प्रचार आणि मतदान पार पडल्यानंतर आता कार्यकर्ते आणि उमेदवारांची धाकधुक वाढली हे. मतमोजणीची आता प्रत्येकजण वाट पाहत आहे. 18 जानेवारीला मतमोजणी होईल.
Read Also :
- शेतकरी रस्त्यावर उतरणार, 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आंदोलन
- ‘… म्हणून मी एवढे दिवस गप्प होते’, मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने सांगितले कारण
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन, भाजप आक्रमक
- धनंजय मुंडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका, केली ‘ही’ मागणी
- … तर मीच मागे हटते, आपल्यावरील आरोपांनंतर रेणू शर्मांचे ट्विट